'राजपथ' .... यशाचा पथ.
राजपथ अकॅडमी म्हणजे स्पर्धा परीक्षेतील यशाचा पथ होय. विदयार्थी मित्र मैत्रिणींनो स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील मार्गदर्शनाचा व लेखनाचा पंधरा वर्षापेक्षा जास्त काळाच्या अनुभवातून वाटचाल करताना जे-जे विदयार्थी माझ्या संपर्कात आले त्या - त्या विदयार्थ्यांना स्पर्धा परीक्षा क्षेत्रात कोणत्या ना कोणत्या पदावर यश मिळालेच आहे. तर काहींना माझ्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे चांगलं दृष्टिकोन, व्यापक ज्ञान, समंजस व्यक्तिमत्व व मानसिक कणखरता लाभली आहे की ज्यामुळे त्यांनी त्यांच्या आयुष्यातील परीक्षांमध्ये यश मिळवून एक चांगलं माणूस म्हणून आपली वाटचाल केली आहे.
विद्यार्थ्यांबाबत व्यावसायिक दृष्टिकोनाच्या संबंधाच्या पलीकडे जाऊन आपल्या भारतीय संस्कृतीमधील गुरु-शिष्याच्या नात्याकडे पाहत आपल्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे अशीच तळमळ मनात मी बाळगली आहे. माझ्या या प्रयत्नात बरेच विद्यार्थी म्हणूनच बॅच संपल्यानंतरही माझ्याशी व 'राजपथ अकॅडमी' शी एका बंधनाने बांधले आहेत.
UPSC साठी वैकल्पिक विषय व सामान्य अध्ययनासाठी वैयक्तिक मार्गदर्शन, लेखनसराव, पेपर सोडवून-तपासून देणे व चर्चा करणे अशा अभिनव पद्धतीचा अवलंब मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी करते.
MPSC च्या राज्यसेवा, PSI/STI /ASO सह वनसेवा व इतर सर्व परीक्षांसाठी वर्षभराचे मार्गदर्शन वर्ग गेल्या अनेक वर्षांपासून घेण्यात येतात.
प्रत्येक विद्यार्थ्यांचे वैयक्तिक समुपदेशन व वैयक्तिकरित्या त्याच्या अभ्यासाच्या प्रगतीकडे लक्ष देण्यावर राजपथ अकॅडमीत भर देण्यात येते. बॅच मध्ये फक्त शिकवणे नाही तर विद्यार्थ्यांचा Self Study देखील त्याला यश मिळवून देण्याइतपत होतो की नाही याकडे लक्ष दिले जाते. म्हणून विद्यार्थ्यांकडून गृहपाठ (Homework) करवून घेतला जातो.
स्पर्धा परीक्षेचे अवघड शिवधनुष्य पार पाडण्यासाठी संयम, चिकाटी, सातत्य हे गुण महत्त्वाचे आहेत. आज 'Instant' च्या जमान्यात विद्यार्थ्यांना संयम राखणे शक्य होत नाही व त्यांना यशाचे फळ झटपट हवे असते. अशावेळी माझ्या विद्यार्थ्यांना मी नेहमीच,
“कर्मण्ये वा धिकारस्ते, मा फलेषु कदाचन:।”
या भगवद्गीतेतील वचनाबाबत सांगते. अभ्यासाचे कर्म करीत राहावे, एक ना एक दिवस फळ मिळतेच. स्पर्धा परीक्षेतील यशाचे हे फळ मिळवून देण्यासाठी राजपथ अकॅडमी अत्यंत सचोटीने विद्यार्थ्यांसोबत कायमच कार्यरत राहणार आहे.
सर्वाना उज्ज्वल करिअरसाठी शुभेच्छा !
आपली विश्वासू,
प्रा. मीता चौधरी,
संस्थापक व प्रमुख,
राजपथ अकॅडमी, पुणे